Sunday, 28 April 2013

एकदा मी देवाला विचारलं...

स्वप्नात एकदा मी देवाला विचारलं...


नशिबाचं पुस्तक तूच का लिहायचं?


मी पान उलगडायचं, अन जगानं ते वाचायचं,


पानंच संपत आल्यावर... पुस्तक तूच बंद करायचं,


जगाच्या मोठया पसा-यातून एकटं नेऊन जाळायचं !!

देवाचं उत्तर...

तुला कुणी सांगीतलयं, फ़क्त पानं उलगडायला,

मी कधी नाही म्हट्लयं ,

माझ पान फ़ाडायला, अन तुझं पान जोडायला?


तुझं नशीब तुझं तुच लिहायचं...

आता तुच ठरवं, नावासहित मरायचं की


नावं माग ठेऊन जगायचं...!!